नेरळमधील हत्या प्रकरणाने संपुर्ण कर्जत तालुका हादरला! सर्वच आरोपींना केली अटक; सहा दिवस पोलिस कोठडी!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील खांडस गावात परवा रात्री येथिल शिवाजी गोविंद पाटील (वयं ४९) यांची येथिलच ११ जणांनी मिळुन निर्घृण हत्या केल्याचा घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे. नेरळ पोलिसांनी या सर्व आरोपींना शिताफिने अटक करुन न्यायालयात हजर केले. कर्जत न्यायालयाने या सर्व आरोपींना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश नेरळ पोलिसांना दिले आहेत.

सध्या संपुर्ण जगात कोरोना व्हायरस या संसर्गाने हैदोस घातला आहे. असे असतानाच देशात सर्वत्र लाॅक डाऊन आहे. मात्र कर्जत तालुक्यांतील खांडस येथे जमिनीत चर खोदून पाईपलाईन टाकण्याचे कामावरून सुरुवातीला बाचाबाची आणि त्यांनतर हाणामारी होवुन येथे एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येने कर्जत हादरले आहे. नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांना याची खबर मिळताच यांनी तत्काल घटनास्थळी धाव घेतली. आणि आरोपींची धरपकड केली.

यावेळी हत्या झालेल्या ईसमाचा नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सुमारे ११ जणांनी एकत्र येवुन येथिल शिवाजी पाटील यांची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली आहे. ही फिर्याद दाखल झाल्यानंतर कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर आणि नेरळ पोलिस ठाणेचे अधिकारी अविनाश पाटील यांनी आपला फौजफाटा घेवुन खांडस परीसरात जावुन या सर्व आरोपींना शिताफिने अटक केली आहे. विशेष म्हणजे कर्जत तालुक्यांतील पोलिस अधिकारी कोरोना बंदोबस्तात प्रंचड व्यस्त होते. सर्वत्र गुन्हा घडण्याचे प्रकार कमी झाल्याची चर्चा असतानाच खांडस गावात या लाॅक डाऊन कालात घडले्ल्या हत्ये प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याने येथे वातावरण काहीसे निवळले असल्याचे सांगणेत येत आहे. तसेच सर्व आरोपींना पोलिसांनी शिताफिने अटक केल्याने नेरळ पोलिसांची कार्यक्षमतेची प्रचिती पुन्हा एकदा नेरळकरांना दिसुन आली आहे.

दरम्यान नेरळ पोलिसांनी या सर्व आरोपींना आज कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्व अकरा आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश नेरळ पोलिसांना दिले आहेत. या हत्ये प्रकरणाचा अधिक तपास नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील व त्यांचे पोलिस कर्मचारी करीत आहेत

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट