मा. आ. प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या प्रयत्नांना यश MPSC भरती प्रक्रियेला स्थगिती

  मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार MPSC भरती संदर्भात मंत्री विजय वडेट्टीवार व सर्व प्रशासकीय आधिकारी यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक पार पाडली. या बैठकीत संबंधित सचिवांनी पाच वर्षातील भरती संदर्भातील माहिती दिली पण आता पर्यंत झालेल्या एकुण भरतीचा कागदपत्रे-अहवाल देता आला नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी प्रकाश आण्णांनी केली व जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत या भरतीला स्थगितीची मागणी केली तसेच ओपण मधुन झालेल्या भरतीचा आरक्षणातून झालेल्या भरतीशी काहीही संबंध जोडु नये असे सांगितले. यावर मंत्री महोदयांनी ताबडतोब चौकशीचे आदेश दिले तसेच चालू भरतीला सुद्धा स्थगितीचा आदेश दिले आहेत.
तसेच आज मा. आ. प्रकाश शेंडगे यांनी दुसरा महत्त्वाचा प्रश्न मंत्री व पदाधिकार्यांसमोर मांडला तो म्हणजे आजपर्यंत विद्यालय महाविद्यालयामध्ये झालेल्या भरती मध्ये सुद्धा धनगर समाजाच्या उमेदवारांच्या राखीव जागा भरल्या नसल्याचे पुरावे-जाहिरातींचा बंच मंत्र्यांना दिला व या भरतींची सुद्धा चौकशीची मागणी केली. यावर सुद्धा मंत्री महोदयांनी ताबडतोब चौकशीचे आदेश दिले आहेत. एकंदरीत आज आपल्या दोन महत्त्वाच्या विषयावर मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.मा. आमदार प्रकाश शेंडगे यांच्या प्रयत्नांना आणखी एक मोठे यश आले आहे ते म्हणजे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात सहा विभागांमध्ये  १२ वसतीगृह सुरू करण्याची महाराष्ट्र शासनाची घोषणा मा. ना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुरू होणार वस्तीगृह. धनगर समाजाच्या १२०० मुली व १२०० मुले अशी २४००चे विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.



रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट