महाराष्ट्रात शिवसेना आघाडीचे सरकार येणार?: आमदार फोडण्यात अपयश आल्यामुळे भाजपची माघार

मुंबई(प्रतिनिधी) विरोधी पक्षांचे आमदार फोडण्यात भाजपला अपयश आल्यामुळे काल सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतून  भाजपने अखेर माघार  घेतली. त्यामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी च्या मदतीने शिवसेनेचे सरकार येण्याची शक्यता आहे.
काल पर्वापर्यंत भाजपवाले आमचेच सरकार येणार असे सांगत होते पण शिवसेनेसह सगळ्याच पक्षांनी आपले आमदार फुटणार नाही याची कडेकोट काळजी घेतली. त्यामुळे भाजपचे वांदे झाले आणि अपेक्षित बहुमताचा आवश्यक ते संख्याबळ त्यांना जमवता आले नाही आणि अशा स्थितीत माघार घेण्यावाचून त्यांना पर्याय नव्हता, शेवटी शिवसेनेच्या माथ्यावर खापर फोडून भाजपने माघार घेतली.
राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला शनिवारी सत्ता स्थापण्याची निमंत्रण दिले होते. त्यानंतर काल वेगवान घडामोडी घडल्या. भाजपने प्रयत्न करून पाहिला पण फोडाफोडीचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर भाजप कोअर कमिटीच्या २ बैठका झाल्या. या बैठकीला केंद्रीय निरीक्षक तर हजर होतेच पण विडिओ कॉन्फरसिंग वरून अमित शहा यांनीही आमदारांशी संपर्क साधला. मात्र भाजप आमदारांमध्ये सत्ता स्थापण्यावरून दोन गट पडले एका गटाचे मत होते की सरकार स्थापन करावे पण दुसरा गट मात्र अल्पमतातील सरकार स्थापन करण्यास तयार नव्हता. अखेर दोन तास चाललेल्या बैठकीनंतर भाजपने सता स्थापनेच्या प्रक्रियेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि बैठकीनंतर राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेबाबत असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे आता शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे कारण काँग्रेसचे सर्व आमदार जरी सेनेला पाठींबा द्यायला तयार असले तरी पक्षश्रेष्ठी मात्र तळ्यात मळ्यात आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट