कोल्हापूर येथील व्यंकटेश शाळा परिवार हुपरी च्या प्रांगणात ७० झाडांचे वृक्षारोपण
- by Adarsh Maharashtra
- Oct 09, 2019
- 977 views
कोल्हापूर: व्यंकटेश शाळा परिवार कल्याणी पार्क हुपरी च्या शाळा परिसरात ७० फळ व फुल झाडांचे वृक्षारोपण विविध मान्यवर , विविध संघटना प्रमुख, जिल्हा व तालुकास्तरावरील विविध स्पर्धातील विजेते विद्यार्थी - विद्यार्थीनी, शाळांचे विभाग प्रमुख , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये आंबा, चिक्कू, आवळा, फनस, लिंबू,संत्री, मोसंबी,रामफळ, सिताफळ,पेरु, जांभूळ , नारळ, ओल्सपाइस, कमालपत्री,पांढरा चाफा,पिवळा चाफा व अनंत अश्या फळ व फुल झाडांचा समावेश आहे.
यामध्ये प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नानासाहेब गाट, जिवन प्राधिकरण राज्य सदस्य महावीर गाट आण्णा, कोल्हापूर जिल्हा व्हाॅलीबाॅल असोसिएशन चे अध्यक्ष यशवंतदादा पाटील, विलासराव शिंदे सरकार परिवार, सुभाषराव, सुनिल व विद्यासागर भोजे परिवार, कै.बापूसाहेब माळी परिवार, सुभाष माळी परिवार, उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे,.शशिकांत खोत, प्रकाशराव देशपांडे, सुनिल विद्याधर गाट, शेती तज्ञ सुकुमार मोरे, बाबुराव रोड्डे, संस्था अध्यक्ष घनश्याम आचार्य व संचालक राजेंद्र माळी,संजय माने, शिवाजीराव भोसले, राजेंद्र शिंदे, बालमंदिर विभाग प्रमुख मनिषाताई रानमाळे, प्राथमिक विभाग प्रमुख कुंतिनाथ गंगाई, माध्यमिक विभाग प्रमुख दिपाली भारती, स्वराज फौंडेशनचे प्रतिक निंबाळकर व पृथ्वीराज (जयराम) गायकवाड, लायन्स क्लब हुपरीचे रमेश पाटील, प्रशांत रेविडगार, प्रार्श्वनाथ म्हाकाण, रोटरी क्लब ऑफ हुपरी चे राजकुमार एकांडे , शशिकांत खोत, राजेंद्र माळी, रोटरॅक्ट क्लब चे ऋचा आचार्य व सम्मेद गाट, विरसेवा दल हुपरी चे संघनायक बाहूबली गाट , अभिजीत पाटील, अमोल गाट सर, हुपरी पत्रकार संघाचे अमजद नदाफ, बबाळासाहेब कांबळे, मुबारक शेख सर, व विनोद खोत , जिल्हा पातळीवर विजेती खेळाडू कु. मानसी मिलिंद इंग्रोळे व इतर तालुका पातळीवरील विजेते खेळाडू विद्यार्थी - विद्यार्थ्यीनी , शिक्षकेत्तर कर्मचारी किरण कांबळे , कल्पनाताई कुलकर्णी, राणी पतंगे, व वृक्ष लावणारे दिवटे मामा, चिखले मामा व सहकारी, तिन्ही विभागाचे सर्व शिक्षक - शिक्षिका यांच्या अमृत हस्ते संपन्न झाले. सदर वृक्षारोपणाचे नियोजन मनिषाताई रानमाळे, अनिल गिरी सर व किरण नाईक यांनी केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम