रोईंगपटू निखिल सोनवणेवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला - एकजण ताब्यात दोघे अल्पवयीन

नाशिक:  राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या निखिलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावं लागणार आहे.या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून दोघा अल्पवयीन मुलांची विचारपूस सुरू आहे.
रोईंगपटू निखिल मंगळवारी रात्री सराव करून चोपडा लॉन्स येथून जात होता. त्याचवेळी तेथील पेट्रोल पंपासमोर तिघांनी  त्याला अडवलं. त्याच्याकडे तंबाखूची मागणी केली. निखील तंबाखू खात नसल्यामुळे त्याने नकार दिला.यावेळी चोरट्यांना राग आल्याने त्यांनी निखीलवर कोयता आणि चाकूने हल्ला केला. त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना पंचवटी पोलिसांना कळताच पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयित मुलांची विचारपूस केली असता त्यातील दोन अल्पवयीन आहे.यातील दीपक सुकदेव झगडे (20) याला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेला मुकावं लागणार आहे. पुण्यातील नाशिक फाट्याजवळ आर्मी बोटिंग क्लब येथे 17 ते 19 मे दरम्यान राज्यस्तरीय रोईंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी निखिल कसून सराव करत होता. याआधीही त्यानं राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकासह रौप्य पदकाची कमाई केली आहे.
 शहरात घरफोडी, सोनसाखळी चोरी, लुटमार सारखे गुन्हे वाढले आहे. जुना गंगापूर नाका येथून खेळाडू निखिल हा दुचाकीवरून घराकडे जात होता. यावेळी त्याची वाट अडवून रोख रक्कम, मोबाईल आदी वस्तू लुटण्यासाठी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात निखील ला गंभीरपणे दुखापत झाली आहे याच्यावर देवगावकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या हल्ल्या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून यातील हल्लेखोर पकडण्यात आले आहेत. 17 ते 19 मे दरम्यान पुण्यात त्याची स्पर्धा आहे, मात्र तो जाऊ शकणार नाही. निखिल हा रोइंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे.त्याच्यावर झालेल्या या हल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट